Heatwave Alert Maharashtra सध्या देशभरात उष्णतेची लाट (Heatwave) प्रचंड तीव्र झाली आहे आणि अनेक भागांमध्ये पारा नवनवीन उच्चांक गाठत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध पातळ्यांवर अलर्ट जारी केले असून राजस्थान, दिल्ली, गुजरातपासून ते महाराष्ट्रापर्यंत उन्हाचा जोर वाढत आहे.
२४ तासांत तापमानात विक्रमी वाढ
बाडमेर (राजस्थान) आणि कांडळा (सौराष्ट्र) येथे तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पश्चिम राजस्थान, कच्छ, सौराष्ट्र भागात ‘रेड अलर्ट’ जारी. उष्माघात (Heatstroke) टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
कोणत्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट राहणार?
एप्रिल ७ ते १० दरम्यान पुढील राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रात (Maharashtra) मुखतः विदर्भ, मध्य प्रदेश, दिल्ली हरियाणा या राज्यांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याची शक्यता आहे. ८ आणि ९ एप्रिलसाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर १० एप्रिलसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
Heatwave Alert महाराष्ट्रात उष्णतेसोबत गारपीटही
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात खालील जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव जाणवणार: पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अकोला आणि संपूर्ण विदर्भ तसेच, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गारांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण आणि ईशान्य भारतात पावसाचे आगमन
केरळ, तमिळनाडू, आसाम, मेघालय येथे जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. आसाममध्ये विजांसह पावसाची शक्यता, तर झारखंड, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याचा अंदाज (Weather Update) वर्तवण्यात आला आहे. या राज्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.