राज-उद्धव युतीच्या चर्चांवर अजित पवारांची ‘दादा स्टाईल’ प्रतिक्रिया; म्हणाले – “नाक खुपसायची गरज नाही”

Sourabh Patil

Ajit Pawar

Ajit Pawar मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युती. राजकीय वर्तुळात वेगाने चर्चांना उधाण आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या ठाम आणि स्पष्ट भाषेत या चर्चांवर ‘दादा स्टाईल’ प्रतिक्रिया देत पत्रकारांनाच गार केलं.

“हे एकाच कुटुंबातील प्रकरण आहे” – Ajit Pawar

माध्यमांनी मनसे-शिवसेना युतीबाबत (Raj-Uddhav alliance) प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही स्वतंत्र राजकीय पक्षांचे नेते आहेत. कोणाशी युती करायची, हा पूर्णतः त्यांचा राजकीय आणि वैयक्तिक निर्णय आहे. इतर कोणालाही त्यात नाक खुपसायची गरज नाही.”

यावर भर देत ते पुढे म्हणाले,
“जर त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांनाही वाटत असेल की एकत्र यावं (raj and uddhav together), तर इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये. प्रत्येकजण आपले निर्णय स्वतःच्या विवेकबुद्धीने घेतो. कोण येईल एकत्र, कोण राहील वेगळं – हे ठरवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक पक्षाला आहे.”

राज ठाकरे यांची सकारात्मक भूमिका

दुसरीकडे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,
“कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी वैयक्तिक मतभेद फार किरकोळ असतात. महाराष्ट्राचा मोठा चित्र पाहणं गरजेचं आहे.”

राज ठाकरेंनी पुढे सांगितले,
“हा विषय केवळ माझ्या इच्छेचा नाही. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागतो. एकत्र येणं अशक्य वाटत नाही, परंतु यासाठी दोघांचीही समान इच्छा असावी लागेल.”

युती झाल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

राजकीय विश्लेषकांच्या मते, जर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे एकत्र आले, तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व इतर पक्षांना जबरदस्त आव्हान मिळू शकते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या (Ajit Pawar) परखड प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. एकत्र येणार की पुन्हा होणार टक्कर?, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे की ठाकरे + ठाकरे?.


Leave a Comment