महाराष्ट्राला समृद्धीच मोठ गिफ्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 1 मे रोजी समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने होणार खुला

Sourabh Patil

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने लोकांसाठी खुला होणार आहे. यामुळे मुंबई ते नाशिक अवघ्या 3 तासांत आणि मुंबई ते नागपूर केवळ 8 तासांतचा प्रवास शक्य होणार आहे.

इगतपुरी-आमण टप्पा पूर्ण; समृद्धी महामार्ग आता पूर्ण 701 किमी

इगतपुरी ते आमण हा शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. यापूर्वी 625 किमीचा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकसेवेसाठी खुला करण्यात आला होता. आता अखेरचा टप्पा पूर्ण झाल्याने, 701 किलोमीटर लांबीचा संपूर्ण समृद्धी महामार्ग एकाच वेळी प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

55 हजार कोटींचा खर्च, राज्यासाठी आर्थिक गतीचा महामार्ग

सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या भव्य प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि MMRDA यांनी संयुक्तरित्या काम केले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे शेवटच्या टप्प्याचे काम विलंबाने पूर्ण झाले, मात्र आता 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्याचे उद्घाटन होणार आहे.

हा महामार्ग राज्यातील 10 प्रमुख जिल्ह्यांना थेट जोडतो, तर 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे या महामार्गाचा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.

महत्वाचे कनेक्टिव्हिटी पॉइंट्स आणि फ्युचर टाऊनशिप्स

हा महामार्ग मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट, तसेच नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडलेला आहे. महामार्गावर २४ इंटरचेंजेस, औद्योगिक केंद्रे आणि नियोजित १८ टाऊनशिप असणार आहेत, जिथे शिक्षण, आरोग्य व मनोरंजन यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.

Samruddhi Mahamarg शहरी आणि ग्रामीण दरी दूर करण्याचा प्रयत्न

या महामार्गाच्या माध्यमातून Maharashtra राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. प्रत्येक ३०–४० किमीवर असलेल्या टाऊनशिप्समुळे स्थानिक रोजगार संधी, दर्जेदार जीवनमान आणि समांतर विकास शक्य होणार आहे.

हा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा रस्ता खुला करणार असून, राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक विकासाला एक वेगळी दिशा देणार आहे.

Leave a Comment