Ration Card KYC राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी केवायसी (Ration Card KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने यासाठी अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही चौथी आणि अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
का आहे केवायसी आवश्यक?
राज्यातील लाखो रेशन कार्डधारक अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारने ही शेवटची संधी देत, ३० एप्रिल २०२५ पूर्वी सर्वांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. अन्यथा त्यांचे: मोफत किंवा अनुदानित धान्य मिळणे बंद होईल. तसेच रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे
सध्या काय स्थिती आहे?
राज्यभरात अजूनही ५ लाखांहून अधिक कार्डधारकांनी केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शेवटची मुदतवाढ देऊन सरकारने नागरिकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
Ration Card KYC करण्याच्या दोन पद्धती – ऑनलाइन आणि ऑफलाइन
1. ऑफलाइन केवायसी प्रक्रिया:
- जवळच्या रेशन दुकानात भेट द्या
- रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जा
- बायोमेट्रिक मशीनवर बोटांचे ठसे देऊन पडताळणी पूर्ण करा
2. ऑनलाइन केवायसी प्रक्रिया:
- ‘Mera KYC’ आणि ‘Aadhaar Face RD’ हे दोन अॅप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करा
- राज्य निवडून आधार क्रमांक टाका
- चेहऱ्याची पडताळणी (Face Verification) अॅपद्वारे करा
- पडताळणी पूर्ण झाल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण मानली जाईल
ration card kyc last date maharashtra ज्या रेशन कार्डधारकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ३० एप्रिल २०२५ पूर्वी ती पूर्ण करून मिळणाऱ्या शासकीय लाभांचा लाभ सुरू ठेवावा. वेळेत केवायसी न केल्यास रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता असून, धान्य लाभ थांबू शकतो.
तरी वेळेवर कारवाई करा आणि तुमचा रेशन कार्डचा लाभ चालू ठेवा!