“१९७१ आणि २०२५ एकसारखे नाहीत”: पाकिस्तानविरुद्ध युद्धाच्या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांचे वक्तव्य

Sourabh Patil

Shashi Tharoor

Shashi Tharoor “१९७१ मध्ये इंदिरा गांधींनी उपखंडाचा नकाशा बदलला, परंतु २०२५ च्या परिस्थिती वेगळ्या आहेत,” असं म्हणत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीबाबत आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेसने नुकत्याच झालेल्या युद्धविरामानंतर इंदिरा गांधींच्या १९७१ मधील नेतृत्वाची आठवण करून देत नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शशी थरूर म्हणाले, “१९७१ मधील विजय हा भारतासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. इंदिरा गांधींनी उपखंडाचा नकाशाच बदलून टाकला. मात्र १९७१ आणि २०२५ या दोन्ही काळांतील परिस्थितीत मोठा फरक आहे. आजच्या युद्धाचे स्वरूप वेगळं आहे.”

ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानशी चाललेला संघर्ष आता अनावश्यक पातळीवर जात होता. भारताला शांतीची गरज आहे. पूंछमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले. जनतेने खूप सहन केलंय. युद्ध थांबवू नये असं मी म्हणत नाही, पण हे युद्ध पुढे नेण्याची आपली इच्छा नव्हती. आपण दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता – आणि तो धडा शिकवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.”

पहल्गाम हल्ल्याचे दहशतवादी सुटू नयेत – Shashi Tharoor

थरूर यांनी स्पष्ट केलं की, “पहल्गाम हल्ल्यात (Pahalgam terrorist attack) २६ निष्पाप नागरिक मारले गेले. त्यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढणं हे आवश्यक आहे. हे काम काही दिवसांत होणार नाही, कदाचित महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर होईल, पण आपण हे केलंच पाहिजे. देशातील निष्पाप लोकांच्या मृत्यूमागे असलेल्यांना सुटू द्यायचं नाही. पण म्हणून संपूर्ण देशाला एका प्रदीर्घ युद्धात झोकून देणं योग्य नाही.”

“या संघर्षामध्ये आपल्याला अधिक जीवितहानी, अधिक आर्थिक नुकसान आणि अस्थिरता याचा धोका होता. आज भारताची प्राथमिकता काय आहे? – तर देशाचा विकास, लोकांची प्रगती, आणि समृद्धी. अशावेळी शांतीच योग्य पर्याय आहे,” असं ते म्हणाले.

१९७१ च्या युद्धाची तुलना आजच्या संघर्षाशी करू नये – थरूर यांचा सल्ला

“१९७१ मध्ये आपण नैतिक कारणासाठी लढत होतो. बांगलादेश मुक्ती युद्ध हे लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होतं. पण आजचा संघर्ष वेगळा आहे. पाकिस्तानचं लष्करी सामर्थ्य, तंत्रज्ञान, यंत्रणा यामध्ये मोठा बदल झाला आहे. जर आपण युद्ध अधिक काळ चालू ठेवलं असतं, तर दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी झाली असती,” असं थरूर यांनी स्पष्ट केलं.

“७ मे रोजी जी कारवाई झाली (Operation Sindoor), ती दीर्घकालीन युद्धाची सुरुवात नव्हती. आपण escalation नको होतं, पण पाकिस्तानकडून ते झालं. त्यामुळे आपल्यालाही उत्तर द्यावं लागलं. मात्र जर हे सुरूच राहिलं असतं, तर आपण एका अशा युद्धात अडकलो असतो ज्याला शेवटी काही उद्दिष्टच उरलं नसतं. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्ती हे स्पष्ट उद्दिष्ट होतं. पण आज फक्त गोळ्या झाडण्यात काही अर्थ नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसकडून इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची आठवण, भाजपची टीका

ceasefire जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर इंदिरा गांधींचे फोटो शेअर करत त्यांच्या नेतृत्वाची आठवण करून दिली. यावर भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी टीका करत विचारलं की, “काँग्रेसला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण येत नाही का? २६/११ हल्ल्यानंतर यूपीए सरकारने काय कारवाई केली होती?”

दरम्यान, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्या ‘न्यूट्रल साइट’ या वक्तव्यावरही प्रश्न उपस्थित करत विचारलं की, “सरकार काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाचं मध्यस्थीचं दार उघडत आहे का?”

जयराम रमेश म्हणाले, “१९७१ मध्ये इंदिरा गांधींनी दाखवलेलं नेतृत्व हे देशासाठी अभिमानास्पद होतं आणि आज देशाला ती आठवण होणं स्वाभाविक आहे.”

Shashi Tharoor’s statement on the backdrop of the war against Pakistan, “1971 and 2025 are not the same”

Leave a Comment