Pahalgam attack जम्मू-काश्मीरमधील बैसरन घाटीत पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भारत-पाकिस्तानमधील कुटनैतिक आणि राजकीय तणाव अधिकच वाढलेला दिसत आहे.
बीसीसीआय आणि भारताच्या मुख्य प्रशिक्षकांवरही दबाव
हल्ल्यानंतर बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत-पाकिस्तान दरम्यान कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका लवकरच होणार नाही. याशिवाय, भारताचे क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ISIS काश्मीरकडून धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
Pahalgam attack दानिश कनेरियाची पाकिस्तानवर थेट टीका
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) यांनी आपल्या देशाच्या सरकारवर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ट्विटरवर त्यांनी लिहिले:
“जर पाकिस्तानचा या हल्ल्यात काहीही सहभाग नसेल, तर पंतप्रधान @CMShehbaz यांनी अद्याप याचा निषेध का केलेला नाही? तुमच्या सुरक्षाबळांना अचानक अलर्ट का केलं जातंय? कारण तुम्हालाही माहीत आहे की, तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देताय. लाज वाटली पाहिजे.”
दानिश कनेरिया (Danish Kaneria) हे पाकिस्तानसाठी २००० ते २०१० दरम्यान खेळलेले एकमेव हिंदू क्रिकेटपटू होते. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्यांच्यावर ECB ने जन्मभरासाठी बंदी घातली होती. २०१८ मध्ये त्यांनी एका बुकीला भेट दिल्याची कबुली दिली होती, मात्र तेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश त्यांना माहित नव्हता, असं त्यांनी सांगितलं होतं.
हल्ल्यात नौदल अधिकारी आणि गुप्तचर अधिकाऱ्याचाही मृत्यू
या दहशतवादी हल्ल्यात २६ वर्षीय भारतीय नौसेना अधिकारी विनय नरवाल (Vinay Narwal) आणि इंटेलिजन्स ब्युरोचे एक अधिकारी देखील मारले गेले. मृतांमध्ये अरुणाचल प्रदेश, केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतील पर्यटकांचा समावेश आहे.
टीआरएफने घेतली जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी TRF (The Resistance Front) या दहशतवादी संघटनेने घेतली असून, ही संघटना पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित असल्याचं मानलं जातं. ही घटना पुलवामानंतरची सर्वात मोठी दहशतवादी कारवाई ठरली असून, केंद्र सरकार लवकरच कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं संकेत मिळत आहेत.
पाकिस्तानकडून अद्याप अधिकृत निषेधाची भाषा नाही; मात्र आताच जगभरातून टीका सुरू
पाहलगाम हल्ल्यानंतर जागतिक स्तरावरही पाकिस्तानवर दबाव वाढण्याची शक्यता.